अक्षरेच बोलत राहतात मग माझ्याशी..
मलाही माहित नसते नक्की काय करायचं. मन मोकळं करण्यासाठी काही वेळा योग्य माणसेच सापडत नाहीत, ती कार्यमग्न असल्यामुळे. मग कोणाशी बोलणार मी. काय करायच अशा वेळी. मन मोकळं करायचं असतं. मग डोकावत राहतो मी भूतकाळात.
भूतकाळातील माझा छंद मला पुन्हा खुणावत राहतो. मग अ, ब, क पासून सर्व अक्षरे मेंदूत येत राहतात माझ्या आणि मग बोलायला लागतात माझ्याशी. मग आपोआप हात वळवळायला चालू होतात आणि मग माझ्या हातात एका क्षणात पेन येत. सुरु होतात मग माझे सूर त्या कागदाबरोबर.
मी उतरवत जातो फक्त माझ्या मनातील शब्द. हळूहळू कागद भरत जातात आणि अक्षरे बोलू लागतात माझ्याशी. तेच मला प्रेरणा देतात मग लिहीण्यासाठी. खूप वेळ मग आम्ही गप्पा मारतो. ती मला चिडवतात आणि मग मी का शांत बसेन , मी हि चिडवतो खूप त्यांना. मग अक्षरे रडतात , कागद ओले होतात. मग मलाच वाईट वाटते. मग मी पुन्हा हसवतो त्यांना. भूतकाळातील आठवणी सांगून. आणि ह्या आठवणी काढताना माझेच डोळे मग पाणावू लागतात. कागद फडफडत राहतो मग वाऱ्यावर आणि अचानक थांबतो तो कुठल्यातरी पानाकडे येऊन. मी खाली बघतो तर माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांचे पान त्याने उघडलेलं असते. मग ते वाचून पुन्हा आम्ही हसू लागतो. आम्ही पुन्हा रमतो मग आमच्याच भावविश्वात. अक्षरं पुन्हा उमटू लागतात माझी. मग मात्र तो पण रडत नाही आणि मी हि रडत नाही. कारण आम्ही ठरवलेलं असत , सारखं नाही रडायचं, आपण फक्त हसायचं आणि हसवायच, मनमुराद लिहायचं आणि वर्तमानकाळात जगत रहायचं. आम्ही दररोज नाही भेटत. कधीतरीच भेटतो, पण भेटलो कि बऱ्याच वेळ गप्पा मारतो. पण मध्येच तो मला थांबवतो आणि म्हणतो अमित मला जायचंय. एक महत्वाचे काम आहे. आताही गप्पा रंगत आल्यात पण तो तेच सांगतोय, कि मला जावं लागणार आहे. परत येतो म्हणे 4 दिवसात. ठीक आहे मित्रा जातोच आहेस तर जा लेका. परत भेटूच.
अशी आहे माझी कागद आणि अक्षरांसोबतची मैत्री.
म्हणूनच मी म्हणतो ना की, अक्षरचं बोलत राहतात मग माझ्याशी....
© अमित संजय कुलकर्णी
गडहिंग्लज
मोबा- 7744003900
मलाही माहित नसते नक्की काय करायचं. मन मोकळं करण्यासाठी काही वेळा योग्य माणसेच सापडत नाहीत, ती कार्यमग्न असल्यामुळे. मग कोणाशी बोलणार मी. काय करायच अशा वेळी. मन मोकळं करायचं असतं. मग डोकावत राहतो मी भूतकाळात.
भूतकाळातील माझा छंद मला पुन्हा खुणावत राहतो. मग अ, ब, क पासून सर्व अक्षरे मेंदूत येत राहतात माझ्या आणि मग बोलायला लागतात माझ्याशी. मग आपोआप हात वळवळायला चालू होतात आणि मग माझ्या हातात एका क्षणात पेन येत. सुरु होतात मग माझे सूर त्या कागदाबरोबर.
मी उतरवत जातो फक्त माझ्या मनातील शब्द. हळूहळू कागद भरत जातात आणि अक्षरे बोलू लागतात माझ्याशी. तेच मला प्रेरणा देतात मग लिहीण्यासाठी. खूप वेळ मग आम्ही गप्पा मारतो. ती मला चिडवतात आणि मग मी का शांत बसेन , मी हि चिडवतो खूप त्यांना. मग अक्षरे रडतात , कागद ओले होतात. मग मलाच वाईट वाटते. मग मी पुन्हा हसवतो त्यांना. भूतकाळातील आठवणी सांगून. आणि ह्या आठवणी काढताना माझेच डोळे मग पाणावू लागतात. कागद फडफडत राहतो मग वाऱ्यावर आणि अचानक थांबतो तो कुठल्यातरी पानाकडे येऊन. मी खाली बघतो तर माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांचे पान त्याने उघडलेलं असते. मग ते वाचून पुन्हा आम्ही हसू लागतो. आम्ही पुन्हा रमतो मग आमच्याच भावविश्वात. अक्षरं पुन्हा उमटू लागतात माझी. मग मात्र तो पण रडत नाही आणि मी हि रडत नाही. कारण आम्ही ठरवलेलं असत , सारखं नाही रडायचं, आपण फक्त हसायचं आणि हसवायच, मनमुराद लिहायचं आणि वर्तमानकाळात जगत रहायचं. आम्ही दररोज नाही भेटत. कधीतरीच भेटतो, पण भेटलो कि बऱ्याच वेळ गप्पा मारतो. पण मध्येच तो मला थांबवतो आणि म्हणतो अमित मला जायचंय. एक महत्वाचे काम आहे. आताही गप्पा रंगत आल्यात पण तो तेच सांगतोय, कि मला जावं लागणार आहे. परत येतो म्हणे 4 दिवसात. ठीक आहे मित्रा जातोच आहेस तर जा लेका. परत भेटूच.
अशी आहे माझी कागद आणि अक्षरांसोबतची मैत्री.
म्हणूनच मी म्हणतो ना की, अक्षरचं बोलत राहतात मग माझ्याशी....
© अमित संजय कुलकर्णी
गडहिंग्लज
मोबा- 7744003900
Good one.
ReplyDeleteKeep it up.