Thursday, October 20, 2016

म्हणे अजगरासोबत सेल्फी काढताना अजगर चावला..

म्हणे अजगरासोबत सेल्फी काढताना अजगर चावला..

आजकाल सेल्फी काढायचे प्रस्थ वाढायला लागलय. दोनच दिवसांपूर्वी मी एका न्युज चॅनेल वर त्याची बातमी पाहिली. सेल्फी काढताना अजगर चावला, मगरीसोबत फोटो काढताना मगरीने गिळले आणि बऱ्याच वेळा फोटो काढताना तोल जाऊन पडून मृत्यू. खरं तर अशा बातम्या पालकांना काळजी करायला लावणाराच आहे. कारण मी गेले एक वर्ष पाहतोय कि सेल्फी मुळे बऱ्याच जणांना त्यांचा जीव या ना त्या कारणाने गमवावा लागलाय. सेल्फी काढू नये असे माझे अजिबात मत नाहीय. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. कारण मग त्यासाठी आपण मागे लागतो आणि मग होत्याचे न्हवतं करून बसतो. माझा आजचा विषयच अतिरेकावर आहे.
अतिरेकाची बरीच उदाहरणे मी हल्ली जवळून अनुभवत आहे. एकतर कॉलेज मधील मुलांना शिकवताना त्यांना जवळून बघता येतं आणि अतिरेकाची भूमिका खूप जवळून बघता येते.पण अतिरेक हा फक्त कॉलेजच्या मुलांमध्येच आहे असं नाही. तो एक त्यातील भाग आहे.
पहिला अतिरेक म्हणजे आपल्या पालकांकडून मुलांवर असलेल्या अभ्यासाचा आणि अपेक्षांचा अतिरेक.
माझा पाल्य हा प्रत्येक क्षेत्रात पारंगत झाला पाहिजे कारण ती आजच्या पिढीची गरज आहे ह्या खोट्या भ्रमात पालकांचे वावरणे. त्यातून मग सुरु होते कोवळ्या वयातील मुलांकडून त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट काळ आयुष्यातील गरज नसलेल्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून छिनावून घेण्याचा काळ.
खरं तर त्यांचे बालपण त्यांना उपभोगता यायला हवं.
त्यांच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम काळ. ज्या वयात माझ्या किंवा माझ्या अगोदरच्या काळातील कितीतरी जण आमच्या लहानपणी माती खाण्यापासून, मातीत राड होईपर्यंत आणि सायकलची चेन पडली तर ती लावण्यासाठी हातापासून शर्ट आणि पँट काळी करण्यात आमचे बालपण गेले. रस्त्यावरचे हैस्पृट( बर्फाचे icecream), चणे, वाटाणे ते अगदी पाणपोईला हात लावून पाणी पिताना आम्हाला किंवा आमच्या आई वडिलांना काहीच नाही वाटले. पण आज मुलांचा वेळ वाचावा म्हणून त्यांना मोबाईल देणे , मॉल मध्ये शॉपिंग करणे, इलेक्ट्रीक सायकल किंवा बाइक देणे आणि सीडलेस फळे देण्यापासून ते लो कोलेस्ट्रॉल असलेली चॉकलेट्स देणे हे सर्व चालू आहे. त्याच कारण तर मुलांचा वेळ वाचणे याबरोबरच त्यांना मोठेपणी ब्लड प्रेशरचा त्रास होऊ नये असा असतो.
पण मुलांच्या म्हातारपणीचा त्रास वाचवण्यासाठी आज ते मुलांच्या वर्तमानकाळाचा का बळी देतात हे लक्षात येत नाही. तोंडातुन एखादी गोष्ट बाहेर पडली की ती लगेच देण्यामुळे आज त्यांना त्याचे महत्व कळेनासे झालंय.
तसंच आजच्या काळातील काही मुलांचं पण आहे. त्यांना मिळालेल्या अमर्याद स्वातंत्र्याचा ते गैरवापर करताहेत. आई वडिलांनी ठेवलेल्या विश्वासाचा ते चुकीचा वापर करताहेत. त्यामुळे आज हीच मुले त्यांच्या क्षमता चुकीच्या ठिकाणी वाया घालवताहेत. आजची पिढी हि खूप हुशार आहे पण ती हुशारी चुकीच्या ठिकाणी वापरली जाणे हे साहजिकच चिंताजनक आहे. हि मुले अतिरेकाच्या आहारी जायला लागलेत. अतिरेकाच्या विळख्यातून ह्यांना सोडवण्याची जबाबदारी आता मात्र शिक्षकांची आणि पालकांची आहे. पण अतिरेकाच्या विळख्यातून आज खऱ्या अर्थाने शिक्षकांनी आणि पालकांनी स्वतः अतिरेकाच्या बळीपासून वाचण्याची असे म्हणत बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले हि म्हण सार्थ करणे गरजेची आहे, असे मला वाटते.

 © अमित संजय कुलकर्णी.
     गडहिंग्लज.

Saturday, October 8, 2016

शिकवा मुलांना झेपावण्यासाठी--

शिकवा मुलांना झेपावण्यासाठी--

मी माझं काम करत राहतो फक्त..खरंच माहित नसते मी यशस्वी होईन कि नाही..
खरंच मला फक्त शिकवायचं असतं, मला माझं 100 % योगदान द्यायचं असतं.. माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आवडेल कि नाही नसतं मला माहीत..
पण मला मुलांना शिकवायचं असते त्यांना कळेपर्यंत.. अगदी जीव तोडून.. शिकवायचं असते त्यांना पुढे नेण्यासाठी..तयार करायच असतं त्यांना ह्या जगात सध्या लागणाऱ्या knowledge साठी..
माझे उद्देश स्पष्ट असतात अश्या वेळी.. माझ्यासमोर त्यांना काय शिकवायचे ह्याचा आराखडा कधीच तयार नसतो कारण आराखडा तयार करून शिकवायला मला कधीच जमल नाही आणि जमणार पण नाही..जे ज्यावेळी गरजेचं ते त्यावेळी शिकवायचं.. कारण माझ्या विद्यार्थांना मी syallbus तर शिकवतच असतो..आणि त्यात माझे विद्यार्थी नेहमीच चांगल्या मार्कांनी पास होत असतात आणि top पण येत असतात.. कारण आम्हा दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास असतो आणि तो विश्वास आम्ही शिक्षक विद्यार्थी आणि मित्र अशा भूमिकेत मिळवत असतो..माझे विद्यार्थी मग भरभरुन गप्पा मारतात माझ्याशी.. बऱ्याच विषयांवर आम्ही बोलतो..कालच माझ्या बारावीच्या एका विद्यार्थिनीने विचारलं मला, सर GST म्हणजे काय हो...बरं वाटलं खूप मला..मुलं साच्याच्या बाहेर येताहेत..
पण...पण...
पण मगच सुरु होते खरी लढाई..कारण हा साचा बऱ्याच जणांना माहित नसतो, मुलांनी ह्या अभ्यासाच्या पलीकडे कधी पाहिलेलं नसते.. typical class ह्या concept मध्ये बरेच जण बाहेरच पडत नाहीत.. change is necessity हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत खूप वेळ झालेला असतो.. pune आणि mumbai सारख्या शहरात गेल्यावर ह्यांच्या marks ना कोणीच विचारत नाहीत.. पण ह्यासाठी आपली Education system जेवढी जबाबदार आहे त्यापेक्षाही जास्त आपले विद्यार्थी जास्त जबाबदार आहेत.. कारण विद्यार्थी कि गुणार्थी किंवा ज्ञानार्थी हे कळेपर्यंत खूपच उशीर झालेला असतो.. आणि मग graduation किंवा post graduation नंतर सुरु होते त्यांची लढाई.. खेड्यातील बरीच मुले लढतात मग communication बरोबर.. मग ते
English असो किंवा मराठी..कारण त्यांना कधी कोणी सांगितलेच नसते कि excellence म्हणजे काय.. मग deal करतात ते त्यांची degree 5000 -6000 मध्ये.. corporate वाले ह्याचा उपयोगच करायला बसलेले असतात.. कोण म्हणतो fresher ना चांगली salary मिळत नाही.. तुम्ही तशी salary मिळण्यासाठी स्वतःला तयार तर केलं पाहिजे ना.. अरे लाथ मारेल तिथे पाणी काढेन असे जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत हे असेच होणार.. तुम्ही जोपर्यंत तुमची गरज निर्माण करणार नाही तोपर्यंत हे असंच होणार.. मग डोक्याला हात लावून बसणारच ना कि एवढे शिकून काय उपयोग.. पण त्यात चूक तुमचीच आहे ना.. तुम्ही मार्क मिळवण्यासाठी अभ्यास केला , excellence साठी नाही त्याचीच ही फळ आहेत..
मी सुरुवात केली बदल करायला मग..यासाठी माझ्या क्लास मधून.. Student Excellence Activity राबवून.. ज्यांना ह्याचे महत्व कळालं ते माझ्यासोबत थांबले आणि ज्यांना mark हवे होते ते बाहेर गेले.. पण गंमत अशी की माझी मुले नेहमीच topper आलीत अगदी कालच्या निकालापर्यंत.. अगदी काल पण माझ्या क्लास ची मुलं test मध्ये पण topper आली.. तीच सर्व Cultural मध्ये, sports मध्ये , कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन , सूत्रसंचालन करण्यामध्ये तरबेज आहेत..  अभिमान आहे मला कि माझी मुलं allrounder होताहेत.. जशी आजच्या coroprate ला हवेत तसेच..
मुलांना शिकवा हो अगदी भरभरून.. पण खूप खोलात जाऊन शिकवा.. असे कधीच करू नका जेवढं syallbus ला आहे.. त्यापलीकडे जे आहे ते सांगा नाहीतर तुमची मुलं कधीच या जगात टिकू शकणार नाहीत.. त्यांना झेपावण्याची शक्ती दया , ऊर्जा दया.. या आकाशात उडू देण्यासाठी त्यांच्या पंखात बळ द्या , एवढीच विनंती.

तुमचाच,
अमित कुलकर्णी.


©अमित संजय कुलकर्णी.

Tuesday, October 4, 2016

अक्षरेच बोलू लागतात माझ्याशी

अक्षरेच बोलत राहतात मग माझ्याशी..

मलाही माहित नसते नक्की काय करायचं. मन मोकळं करण्यासाठी काही वेळा योग्य माणसेच सापडत नाहीत, ती कार्यमग्न असल्यामुळे. मग कोणाशी बोलणार मी. काय करायच अशा वेळी. मन मोकळं करायचं असतं. मग डोकावत राहतो मी भूतकाळात.
भूतकाळातील माझा छंद मला पुन्हा खुणावत राहतो. मग अ, ब, क पासून सर्व अक्षरे मेंदूत येत राहतात माझ्या आणि मग बोलायला लागतात माझ्याशी. मग आपोआप हात वळवळायला चालू होतात आणि मग माझ्या हातात एका क्षणात पेन येत. सुरु होतात मग माझे सूर त्या कागदाबरोबर.
मी उतरवत जातो फक्त माझ्या मनातील शब्द. हळूहळू कागद भरत जातात आणि अक्षरे बोलू लागतात माझ्याशी. तेच मला प्रेरणा देतात मग लिहीण्यासाठी. खूप वेळ मग आम्ही गप्पा मारतो. ती मला चिडवतात आणि मग मी का शांत बसेन , मी हि चिडवतो खूप त्यांना. मग अक्षरे रडतात , कागद ओले होतात. मग मलाच वाईट वाटते. मग मी पुन्हा हसवतो त्यांना. भूतकाळातील आठवणी सांगून. आणि ह्या आठवणी काढताना माझेच डोळे मग पाणावू लागतात. कागद फडफडत राहतो मग वाऱ्यावर आणि अचानक थांबतो तो कुठल्यातरी पानाकडे येऊन. मी खाली बघतो तर माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांचे पान त्याने उघडलेलं असते. मग ते वाचून पुन्हा आम्ही हसू लागतो. आम्ही पुन्हा रमतो मग आमच्याच भावविश्वात. अक्षरं पुन्हा उमटू लागतात माझी. मग मात्र तो पण रडत नाही आणि मी हि रडत नाही. कारण आम्ही ठरवलेलं असत , सारखं नाही रडायचं, आपण फक्त हसायचं आणि हसवायच, मनमुराद लिहायचं आणि वर्तमानकाळात जगत रहायचं. आम्ही दररोज नाही भेटत. कधीतरीच भेटतो, पण भेटलो कि बऱ्याच वेळ गप्पा मारतो. पण मध्येच तो मला थांबवतो आणि म्हणतो अमित मला जायचंय. एक महत्वाचे काम आहे. आताही गप्पा रंगत आल्यात पण तो तेच सांगतोय, कि मला जावं लागणार आहे. परत येतो म्हणे 4 दिवसात. ठीक आहे मित्रा जातोच आहेस तर जा लेका. परत भेटूच.
अशी आहे माझी कागद आणि अक्षरांसोबतची मैत्री.
म्हणूनच मी म्हणतो ना की, अक्षरचं बोलत राहतात मग माझ्याशी....

© अमित संजय कुलकर्णी
     गडहिंग्लज
     मोबा- 7744003900