म्हणे अजगरासोबत सेल्फी काढताना अजगर चावला..
आजकाल सेल्फी काढायचे प्रस्थ वाढायला लागलय. दोनच दिवसांपूर्वी मी एका न्युज चॅनेल वर त्याची बातमी पाहिली. सेल्फी काढताना अजगर चावला, मगरीसोबत फोटो काढताना मगरीने गिळले आणि बऱ्याच वेळा फोटो काढताना तोल जाऊन पडून मृत्यू. खरं तर अशा बातम्या पालकांना काळजी करायला लावणाराच आहे. कारण मी गेले एक वर्ष पाहतोय कि सेल्फी मुळे बऱ्याच जणांना त्यांचा जीव या ना त्या कारणाने गमवावा लागलाय. सेल्फी काढू नये असे माझे अजिबात मत नाहीय. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. कारण मग त्यासाठी आपण मागे लागतो आणि मग होत्याचे न्हवतं करून बसतो. माझा आजचा विषयच अतिरेकावर आहे.
अतिरेकाची बरीच उदाहरणे मी हल्ली जवळून अनुभवत आहे. एकतर कॉलेज मधील मुलांना शिकवताना त्यांना जवळून बघता येतं आणि अतिरेकाची भूमिका खूप जवळून बघता येते.पण अतिरेक हा फक्त कॉलेजच्या मुलांमध्येच आहे असं नाही. तो एक त्यातील भाग आहे.
पहिला अतिरेक म्हणजे आपल्या पालकांकडून मुलांवर असलेल्या अभ्यासाचा आणि अपेक्षांचा अतिरेक.
माझा पाल्य हा प्रत्येक क्षेत्रात पारंगत झाला पाहिजे कारण ती आजच्या पिढीची गरज आहे ह्या खोट्या भ्रमात पालकांचे वावरणे. त्यातून मग सुरु होते कोवळ्या वयातील मुलांकडून त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट काळ आयुष्यातील गरज नसलेल्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून छिनावून घेण्याचा काळ.
खरं तर त्यांचे बालपण त्यांना उपभोगता यायला हवं.
त्यांच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम काळ. ज्या वयात माझ्या किंवा माझ्या अगोदरच्या काळातील कितीतरी जण आमच्या लहानपणी माती खाण्यापासून, मातीत राड होईपर्यंत आणि सायकलची चेन पडली तर ती लावण्यासाठी हातापासून शर्ट आणि पँट काळी करण्यात आमचे बालपण गेले. रस्त्यावरचे हैस्पृट( बर्फाचे icecream), चणे, वाटाणे ते अगदी पाणपोईला हात लावून पाणी पिताना आम्हाला किंवा आमच्या आई वडिलांना काहीच नाही वाटले. पण आज मुलांचा वेळ वाचावा म्हणून त्यांना मोबाईल देणे , मॉल मध्ये शॉपिंग करणे, इलेक्ट्रीक सायकल किंवा बाइक देणे आणि सीडलेस फळे देण्यापासून ते लो कोलेस्ट्रॉल असलेली चॉकलेट्स देणे हे सर्व चालू आहे. त्याच कारण तर मुलांचा वेळ वाचणे याबरोबरच त्यांना मोठेपणी ब्लड प्रेशरचा त्रास होऊ नये असा असतो.
पण मुलांच्या म्हातारपणीचा त्रास वाचवण्यासाठी आज ते मुलांच्या वर्तमानकाळाचा का बळी देतात हे लक्षात येत नाही. तोंडातुन एखादी गोष्ट बाहेर पडली की ती लगेच देण्यामुळे आज त्यांना त्याचे महत्व कळेनासे झालंय.
तसंच आजच्या काळातील काही मुलांचं पण आहे. त्यांना मिळालेल्या अमर्याद स्वातंत्र्याचा ते गैरवापर करताहेत. आई वडिलांनी ठेवलेल्या विश्वासाचा ते चुकीचा वापर करताहेत. त्यामुळे आज हीच मुले त्यांच्या क्षमता चुकीच्या ठिकाणी वाया घालवताहेत. आजची पिढी हि खूप हुशार आहे पण ती हुशारी चुकीच्या ठिकाणी वापरली जाणे हे साहजिकच चिंताजनक आहे. हि मुले अतिरेकाच्या आहारी जायला लागलेत. अतिरेकाच्या विळख्यातून ह्यांना सोडवण्याची जबाबदारी आता मात्र शिक्षकांची आणि पालकांची आहे. पण अतिरेकाच्या विळख्यातून आज खऱ्या अर्थाने शिक्षकांनी आणि पालकांनी स्वतः अतिरेकाच्या बळीपासून वाचण्याची असे म्हणत बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले हि म्हण सार्थ करणे गरजेची आहे, असे मला वाटते.
© अमित संजय कुलकर्णी.
गडहिंग्लज.
आजकाल सेल्फी काढायचे प्रस्थ वाढायला लागलय. दोनच दिवसांपूर्वी मी एका न्युज चॅनेल वर त्याची बातमी पाहिली. सेल्फी काढताना अजगर चावला, मगरीसोबत फोटो काढताना मगरीने गिळले आणि बऱ्याच वेळा फोटो काढताना तोल जाऊन पडून मृत्यू. खरं तर अशा बातम्या पालकांना काळजी करायला लावणाराच आहे. कारण मी गेले एक वर्ष पाहतोय कि सेल्फी मुळे बऱ्याच जणांना त्यांचा जीव या ना त्या कारणाने गमवावा लागलाय. सेल्फी काढू नये असे माझे अजिबात मत नाहीय. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. कारण मग त्यासाठी आपण मागे लागतो आणि मग होत्याचे न्हवतं करून बसतो. माझा आजचा विषयच अतिरेकावर आहे.
अतिरेकाची बरीच उदाहरणे मी हल्ली जवळून अनुभवत आहे. एकतर कॉलेज मधील मुलांना शिकवताना त्यांना जवळून बघता येतं आणि अतिरेकाची भूमिका खूप जवळून बघता येते.पण अतिरेक हा फक्त कॉलेजच्या मुलांमध्येच आहे असं नाही. तो एक त्यातील भाग आहे.
पहिला अतिरेक म्हणजे आपल्या पालकांकडून मुलांवर असलेल्या अभ्यासाचा आणि अपेक्षांचा अतिरेक.
माझा पाल्य हा प्रत्येक क्षेत्रात पारंगत झाला पाहिजे कारण ती आजच्या पिढीची गरज आहे ह्या खोट्या भ्रमात पालकांचे वावरणे. त्यातून मग सुरु होते कोवळ्या वयातील मुलांकडून त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट काळ आयुष्यातील गरज नसलेल्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून छिनावून घेण्याचा काळ.
खरं तर त्यांचे बालपण त्यांना उपभोगता यायला हवं.
त्यांच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम काळ. ज्या वयात माझ्या किंवा माझ्या अगोदरच्या काळातील कितीतरी जण आमच्या लहानपणी माती खाण्यापासून, मातीत राड होईपर्यंत आणि सायकलची चेन पडली तर ती लावण्यासाठी हातापासून शर्ट आणि पँट काळी करण्यात आमचे बालपण गेले. रस्त्यावरचे हैस्पृट( बर्फाचे icecream), चणे, वाटाणे ते अगदी पाणपोईला हात लावून पाणी पिताना आम्हाला किंवा आमच्या आई वडिलांना काहीच नाही वाटले. पण आज मुलांचा वेळ वाचावा म्हणून त्यांना मोबाईल देणे , मॉल मध्ये शॉपिंग करणे, इलेक्ट्रीक सायकल किंवा बाइक देणे आणि सीडलेस फळे देण्यापासून ते लो कोलेस्ट्रॉल असलेली चॉकलेट्स देणे हे सर्व चालू आहे. त्याच कारण तर मुलांचा वेळ वाचणे याबरोबरच त्यांना मोठेपणी ब्लड प्रेशरचा त्रास होऊ नये असा असतो.
पण मुलांच्या म्हातारपणीचा त्रास वाचवण्यासाठी आज ते मुलांच्या वर्तमानकाळाचा का बळी देतात हे लक्षात येत नाही. तोंडातुन एखादी गोष्ट बाहेर पडली की ती लगेच देण्यामुळे आज त्यांना त्याचे महत्व कळेनासे झालंय.
तसंच आजच्या काळातील काही मुलांचं पण आहे. त्यांना मिळालेल्या अमर्याद स्वातंत्र्याचा ते गैरवापर करताहेत. आई वडिलांनी ठेवलेल्या विश्वासाचा ते चुकीचा वापर करताहेत. त्यामुळे आज हीच मुले त्यांच्या क्षमता चुकीच्या ठिकाणी वाया घालवताहेत. आजची पिढी हि खूप हुशार आहे पण ती हुशारी चुकीच्या ठिकाणी वापरली जाणे हे साहजिकच चिंताजनक आहे. हि मुले अतिरेकाच्या आहारी जायला लागलेत. अतिरेकाच्या विळख्यातून ह्यांना सोडवण्याची जबाबदारी आता मात्र शिक्षकांची आणि पालकांची आहे. पण अतिरेकाच्या विळख्यातून आज खऱ्या अर्थाने शिक्षकांनी आणि पालकांनी स्वतः अतिरेकाच्या बळीपासून वाचण्याची असे म्हणत बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले हि म्हण सार्थ करणे गरजेची आहे, असे मला वाटते.
© अमित संजय कुलकर्णी.
गडहिंग्लज.