आज आमच्या मामाचा वाढदिवस.आईचा भाऊ म्हणजे मामा हे लहानपणी आम्ही शिकलो आणि त्यानंतर मामाच्या गावाला जाऊया हे गाणं तर प्रत्येकाच्या ओठावर आहे. मामा हे काही जणांच्या मनात धास्ती म्हणून असतात तर मामा हा काही जणांच्या मनात जवळचा मित्र म्हणून असतो. पण आमचा अभय मामा हे व्यक्तिमत्व खुपच वेगळं. मी आमचा मामा असा उल्लेख का करतोय असा विचार तुम्ही करत असाल पण तो आम्हा सर्वांचा आहे. त्याच्या बहिणी आणि भाऊ,त्याची पत्नी, त्याच्या मुली, त्याचा प्रत्येक भाचा आणि भाची, त्याच्या पुतण्या ह्या सर्वांचा तो विकपॉइंट.
भाचा आणि भाच्यांसाठी तर तो म्हणजे गप्पा आणि अनुभवाने भरलेली खाण.मामाचा धाक आम्हाला असा कधी वाटलाच नाही.साधारणपणे आम्ही कॉलेजच्या वयात आल्यापासून जास्त जवळ आलो. म्हणजे मी असेन किंवा माझा प्रसाद दादा असेल. एकतर तो प्रोफेसर,त्यामुळे तो आम्हाला खूप छान समजून घ्यायचा. त्याला अशा वयातील मुलांची मानसिकता पटकन समजून यायची.
तो खूप भारी आहे. इतका कि आम्ही काहीतरी प्रॉब्लेम त्याला सांगत असताना,त्याच काय असतं कि ओशो म्हणतो,असं म्हणत त्याचा हात आमच्या खांद्यावर कधी पडला हे आम्हाला कळलंच नाही आणि त्यानंतर तो आम्हा सर्व मंडळींच्या गळ्यातला ताईत झाला.आम्हाला कॉलेजला असताना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून आम्ही त्याच्याकडे बघायचो.बऱ्याच वेळा मित्रांशी न बोलता मामाशी बोललेलं आवडायचं कारण मामा हा आमचा मित्र बनत चालला होता. मनातील गोष्टी ओळखायच्या कश्या,माणसं कशी ओळखायची,माणसे जोडायची कशी,जोडलेली माणसे टिकवायची कशी,सर्वांशी कसे हसत खेळत राहायचं,कोणाशी कसं वागायचं,परिस्थिती कशी हाताळायची,ती हाताळताना सर्वाना खुश ठेवायचा प्रयत्न कसा करायचा,वेळेनुरुप बोलण्यातील बदल कसा करावा,शेती कशी करावी,निर्णय कसा घ्यावा आणि कसा घेऊ नये,हजरजबाबीपणा,नाते टिकवताना होणारी कसरत आणि स्वतःच्या चेहऱ्यावर नेहमी हसं ठेऊन आणि दुसऱ्याला हसवत मै जिंदगी का साथ निभाता चला गया,असं म्हणत कसं रहावं ह्यासारख्या कितीतरी गोष्टी आम्ही त्याच्याकडून शिकलो.टोकाचा संयम हि त्याची अजून एक जमेची बाजू.त्याच्या संयमावर एक पुस्तक लिहून एखादा माणूस p.hd करेल.
तसा टोकाचा संयम माझ्या मावशीकडे, आईकडे आणि दोन्ही मामांकडे आहे कारण माझी आज्जी टोकाची संयमी होती, आणि हाच गुण ह्या सर्वांकडे आला जो आजच्या जगात खुपच विरळाने आढळतो.असो,मी परत मामाकडे वळतो.
मामाकडे कधीही जावा किंवा त्याला फोन करा,तो कधी वैतागलेला,त्रासलेला दिसणार नाही.त्याउलट आम्ही वैतागलेले असलो,त्रासलेले असलो कि त्याच्याशी बोलतो.मामा असेल किंवा मामी असेल , दोघेही सदैव हसत.मामा आणि मामीला आम्ही भरपूर चिडवतो,मी वैयक्तिकरित्या तर मामीला खूप चिडवतो पण ना मामीला राग येत ना मामाला. उलट तो आणि आमच्याबरोबर मामीला चिडवण्यात पुढे.पण सहचारिणीबरोबर कसं रहावं किंवा कसं नातं टिकवावं हे सुद्धा त्याच्याकडूनच शिकावं.चुकल्यानंतर सांभाळून घेणं त्याच्याकडून शिकावं.मुलांबरोबर ज्या त्या वयात कसं राहावं हे मामा आणि माझ्या आईकडून शिकावं.आम्ही असू किंवा कोल्हापूरच्या मावशीची मुलं असतील , आम्ही सर्व आईच्या माहेरशी जास्त संपर्कात असतो.त्याच कारण मामा मामी.आज मामा मामी, या म्हणून सगळ्यांच्या मागे लागतात.रहायला लावतात.आमच्या आवडीचे पदार्थ करतात.मामा अजूनही icecream आणतो.आम्ही अजूनही दंगा घालतो,गाण्याच्या भेंड्या खेळतो,कोणालातरी एकाला पकडून चिडवून चिडवून त्याला रडवतो, आणि परत यायच्या दिवशी तोंडं लहान करतो.मग परत मामाच परत भेटायचं नियोजन करतो,परत हसवतो आणि गाडी वळेपर्यंत बाय करत राहतो.
माझे आजोबा मागच्या वर्षी गेले.तसं म्हंटले तर आजी खूपच आधी गेलेली. पण मावशी,आई ह्यांना माहेर संपेल अशी नाही भीती वाटली किंवा आम्हाला आता आजोळ संपले असे नाही वाटले, उलट आम्ही अजून जास्त जवळ आलो. सर्वांनी नाते टिकवून ठेवलंय. अजून घट्ट झालंय. ह्याला माझ्या आज्जीचे संस्कार कारणीभूत आहेत. भावा बहिणींचे नाते कारणीभूत आहे. बहीण भावांच्या नात्याचे उत्तम उदाहरण आहे. बघा ना काय योगायोग आहे. आज हा लेख लिहितानाहि आई माहेरी आहे.
आम्ही सर्व रक्ताच्या नात्यांनी एकत्र आहोत म्हणून आम्ही सर्व एकत्र असू, एकदम मान्य. पण माझ्या दादाच्या अर्धांगिनी, सौम्या वहिनी असतील किंवा माझी बायको प्रिया असेल ह्या सुद्धा मामा मामीच्या फॅन आहेत. चिक्कोडी म्हणजे त्यांचा विकपॉइंट. मामा म्हणजे त्यांचा विकपॉइंट. मामाचा फोन म्हंटले कि दोघी खूष. आमच्या सर्वांचे हे नाते खूप घट्ट आहे आणि ते पण आज्जी आजोबांमुळे आणि त्यानंतर मामामुळे.
मामाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडताहेत, कारण विषय खूप मोठा आहे आणि लिहिताना भावनिक व्हायला झालं की शब्द रुसतात.आता माझंही तसंच झालंय
आज माझ्या मामाला बावन्न वर्षे पूर्ण झालीत. त्याला आज आम्हा सर्वांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.जुग जुग जिओ मामाजी.🎂
©अमित संजय कुलकर्णी.
गडहिंग्लज.
भाचा आणि भाच्यांसाठी तर तो म्हणजे गप्पा आणि अनुभवाने भरलेली खाण.मामाचा धाक आम्हाला असा कधी वाटलाच नाही.साधारणपणे आम्ही कॉलेजच्या वयात आल्यापासून जास्त जवळ आलो. म्हणजे मी असेन किंवा माझा प्रसाद दादा असेल. एकतर तो प्रोफेसर,त्यामुळे तो आम्हाला खूप छान समजून घ्यायचा. त्याला अशा वयातील मुलांची मानसिकता पटकन समजून यायची.
तो खूप भारी आहे. इतका कि आम्ही काहीतरी प्रॉब्लेम त्याला सांगत असताना,त्याच काय असतं कि ओशो म्हणतो,असं म्हणत त्याचा हात आमच्या खांद्यावर कधी पडला हे आम्हाला कळलंच नाही आणि त्यानंतर तो आम्हा सर्व मंडळींच्या गळ्यातला ताईत झाला.आम्हाला कॉलेजला असताना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून आम्ही त्याच्याकडे बघायचो.बऱ्याच वेळा मित्रांशी न बोलता मामाशी बोललेलं आवडायचं कारण मामा हा आमचा मित्र बनत चालला होता. मनातील गोष्टी ओळखायच्या कश्या,माणसं कशी ओळखायची,माणसे जोडायची कशी,जोडलेली माणसे टिकवायची कशी,सर्वांशी कसे हसत खेळत राहायचं,कोणाशी कसं वागायचं,परिस्थिती कशी हाताळायची,ती हाताळताना सर्वाना खुश ठेवायचा प्रयत्न कसा करायचा,वेळेनुरुप बोलण्यातील बदल कसा करावा,शेती कशी करावी,निर्णय कसा घ्यावा आणि कसा घेऊ नये,हजरजबाबीपणा,नाते टिकवताना होणारी कसरत आणि स्वतःच्या चेहऱ्यावर नेहमी हसं ठेऊन आणि दुसऱ्याला हसवत मै जिंदगी का साथ निभाता चला गया,असं म्हणत कसं रहावं ह्यासारख्या कितीतरी गोष्टी आम्ही त्याच्याकडून शिकलो.टोकाचा संयम हि त्याची अजून एक जमेची बाजू.त्याच्या संयमावर एक पुस्तक लिहून एखादा माणूस p.hd करेल.
तसा टोकाचा संयम माझ्या मावशीकडे, आईकडे आणि दोन्ही मामांकडे आहे कारण माझी आज्जी टोकाची संयमी होती, आणि हाच गुण ह्या सर्वांकडे आला जो आजच्या जगात खुपच विरळाने आढळतो.असो,मी परत मामाकडे वळतो.
मामाकडे कधीही जावा किंवा त्याला फोन करा,तो कधी वैतागलेला,त्रासलेला दिसणार नाही.त्याउलट आम्ही वैतागलेले असलो,त्रासलेले असलो कि त्याच्याशी बोलतो.मामा असेल किंवा मामी असेल , दोघेही सदैव हसत.मामा आणि मामीला आम्ही भरपूर चिडवतो,मी वैयक्तिकरित्या तर मामीला खूप चिडवतो पण ना मामीला राग येत ना मामाला. उलट तो आणि आमच्याबरोबर मामीला चिडवण्यात पुढे.पण सहचारिणीबरोबर कसं रहावं किंवा कसं नातं टिकवावं हे सुद्धा त्याच्याकडूनच शिकावं.चुकल्यानंतर सांभाळून घेणं त्याच्याकडून शिकावं.मुलांबरोबर ज्या त्या वयात कसं राहावं हे मामा आणि माझ्या आईकडून शिकावं.आम्ही असू किंवा कोल्हापूरच्या मावशीची मुलं असतील , आम्ही सर्व आईच्या माहेरशी जास्त संपर्कात असतो.त्याच कारण मामा मामी.आज मामा मामी, या म्हणून सगळ्यांच्या मागे लागतात.रहायला लावतात.आमच्या आवडीचे पदार्थ करतात.मामा अजूनही icecream आणतो.आम्ही अजूनही दंगा घालतो,गाण्याच्या भेंड्या खेळतो,कोणालातरी एकाला पकडून चिडवून चिडवून त्याला रडवतो, आणि परत यायच्या दिवशी तोंडं लहान करतो.मग परत मामाच परत भेटायचं नियोजन करतो,परत हसवतो आणि गाडी वळेपर्यंत बाय करत राहतो.
माझे आजोबा मागच्या वर्षी गेले.तसं म्हंटले तर आजी खूपच आधी गेलेली. पण मावशी,आई ह्यांना माहेर संपेल अशी नाही भीती वाटली किंवा आम्हाला आता आजोळ संपले असे नाही वाटले, उलट आम्ही अजून जास्त जवळ आलो. सर्वांनी नाते टिकवून ठेवलंय. अजून घट्ट झालंय. ह्याला माझ्या आज्जीचे संस्कार कारणीभूत आहेत. भावा बहिणींचे नाते कारणीभूत आहे. बहीण भावांच्या नात्याचे उत्तम उदाहरण आहे. बघा ना काय योगायोग आहे. आज हा लेख लिहितानाहि आई माहेरी आहे.
आम्ही सर्व रक्ताच्या नात्यांनी एकत्र आहोत म्हणून आम्ही सर्व एकत्र असू, एकदम मान्य. पण माझ्या दादाच्या अर्धांगिनी, सौम्या वहिनी असतील किंवा माझी बायको प्रिया असेल ह्या सुद्धा मामा मामीच्या फॅन आहेत. चिक्कोडी म्हणजे त्यांचा विकपॉइंट. मामा म्हणजे त्यांचा विकपॉइंट. मामाचा फोन म्हंटले कि दोघी खूष. आमच्या सर्वांचे हे नाते खूप घट्ट आहे आणि ते पण आज्जी आजोबांमुळे आणि त्यानंतर मामामुळे.
मामाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडताहेत, कारण विषय खूप मोठा आहे आणि लिहिताना भावनिक व्हायला झालं की शब्द रुसतात.आता माझंही तसंच झालंय
आज माझ्या मामाला बावन्न वर्षे पूर्ण झालीत. त्याला आज आम्हा सर्वांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.जुग जुग जिओ मामाजी.🎂
©अमित संजय कुलकर्णी.
गडहिंग्लज.